आंदोलन अंकुश संघटनेच्या लढ्याला यश... रस्त्याचे नुकसान करणार्‍या ठेकेदारावर करवाईचे आदेश

 




प्रतिनिधी : लगाम न्यूज नेटवर्क



महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून तारदाळ ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा जलवाहिनीचे काम करत असताना ठेकेदाराने निमशिरगाव - दानोळी दरम्यान सुस्थितीत असलेल्या रोडची साईडपट्टी खराब केली, तसेच मोर्‍यांच्या हेडवॉलचे नुकसान तर केलेच, त्याबरोबर मोर्‍यांची पाईपलाईन मुरुमाने बंद करून टाकली होती. यासंदर्भात आंदोलन अंकुश संघटना शाखा दानोळी ने आवाज उठविला होता, सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून काम तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.



त्याप्रमाणे काल बुधवार दिनांक 04 जून रोजी आंदोलन अंकुश संघटना दानोळी, तसेच दानोळी गावातील ईतर सुजान नागरिक आमरण उपोषणास बसले होते. आमरण उपोषणास बसलेमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. जयसिंगपूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हाके साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर व आंदोलक यांच्यात बैठक घडवून आणून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांचे समाधान झाले नाही. 






अखेर संध्याकाळी  सार्वजनिक बांधकाम विभागाने नमते घेऊन, ठेकेदाराने मोर्‍यांच्या हेडवॉलचे नुकसान केले, त्याबरोबर मोर्‍यांची पाईपलाईन मुरुमाने बंद करून टाकली याबाबत जयसिंगपूर पोलिस स्टेशन मध्ये ठेकेदारच्या विरोधात गुन्हा दाखल करणेबाबत पत्र दिले.



त्याचबरोबर रस्त्याच्या साईडपट्टीचे जे नुकसान ठेकेदाराने केलेले आहे, त्या संदर्भात ठेकेदाराने पाणीपुरवठ्याच्या कामासाठी जे डिपॉझिट ठेवलेले असते. त्यामधून सदर काम करण्याचे आदेश दिले. तसेच 22 लाख 70 हजार 900 व 26 लाख 70 हजार 900 रुपयाचे दोन इस्टिमेट देखील तयार करण्यात आले आहेत.



सदर रस्त्याच्या साईड पट्टीची दुरावस्था होऊन, मोठ मोठे खड्डे पाडले गेले होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. मोऱ्या मुजवल्या गेल्यामुळे पाणी पास होणार नव्हते. आंदोलन अंकुशने दिलेल्या लढ्यामुळे आता सदर रस्ता सुस्थितीत होणार आहे. पाणी पास होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने